Posts

LATEST BLOGS

अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव

अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव करमकर शिल्प संग्रहालयातील शिल्प वैभव पाहून भटकंतीच्या निमित्ताने येथे आल्याचे सार्थक झाले असे वाटले. कनकेश्वर मंदिरात भारतीय मध्ययुगीन काळातील कारागिरांचे शिल्प वैभव पाहिले आणि त्याच परिसरात आधुनिक भारतातील शिल्पकारांनी पाश्चात्य शैलीत घडवलेली शिल्पे पाहण्याचा योग या भटकंतीत आला. सर्व शिल्प वैभव डोळ्यांत साठवून आम्ही अलिबागच्या दिशेने कुलाबा किल्ला पाहण्यासाठी निघालो. दुपारचे २ वाजले होते. ओहोटीची वेळ ४ ची होती आणि अलिबाग १८ किलोमीटर दूर होते. अलिबागला पोहोचून जेवण करून किल्ल्यावर जायला आमच्या हातात फक्त दोन तास होते. आमची चौकडी सासवणे गावावरून अलिबागच्या दिशेने निघाली.  अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पोटपूजेसाठी थांबलो.जेवण संपेपर्यंत पावणे चार वाजले होते. हॉटेलपासून अलिबाग चौपाटी फक्त ९०० मीटरवर होती. चार वाजता चौपाटीवर पोहोचून गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो. अलिबाग चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पश्चिम दिशेला समुद्रात कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट ही दुर्गद्वयी दर्शन देत होती. हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग प्रकारातील...

करमरकर शिल्प संग्रहालय

Image
करमरकर शिल्प संग्रहालय  --- कनकेश्वर मंदिरातील नितांत शांतता, कला, स्थापत्य आणि भक्ती यांचा संगम अनुभवून आम्ही पुढील प्रवासासाठी करमरकर शिल्प संग्रहालयाकडे निघालो. कनकेश्वर मंदिरापासून हे शिल्प संग्रहालय सुमारे १२ किमी अंतरावर आहे. अलिबाग रोडवर येऊन रेवसच्या दिशेने सुमारे ७ किमी प्रवास केल्यानंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या आवास रस्त्याने पुढे गेल्यावर आवास फाट्यावरून ससावणे गावात पोहोचता येते. याच ससावणे गावात, प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर (नानासाहेब करमरकर) यांच्या जन्मगावी, त्यांच्या स्वतःच्या घरात हे शिल्प संग्रहालय उभारण्यात आले आहे. येथे सुमारे १५० हून अधिक शिल्पकृती प्रदर्शित आहेत. करमरकर शिल्प संग्रहालय अलिबागपासून सुमारे १८ किमी, रेवस जेट्टीपासून १२ किमी आणि मांडवा जेट्टीपासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. ससावणे गावात पोहोचताच ‘करमरकर शिल्प संग्रहालय’ अशी पाटी दिसते. तिच्या जवळच कौलारू छपराचे, दुमजली बंगलोवजा घर नजरेस पडते. घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करताच बागेत मांडलेले शिल्पवैभव आपले लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराशी गुडघे छातीजवळ घेत बसलेल्या ए...

कनकेश्वर : निसर्ग–भक्ती–स्थापत्याचा संगम

Image
कनकेश्वर : निसर्ग–भक्ती–स्थापत्याचा संगम डिसेंबरची २१ तारीक, रविवार. कनकेश्वर मंदिर      मुंबई गोरेगावमध्ये सकाळी पाच वाजता हवेत हलकासा गारवा जाणवत होता. अशा प्रसन्न वातावरणात भाऊच्या धक्क्याच्या दिशेने लतेश आणि मी आमच्या ॲक्टिवावरून निघालो. प्लॅन साधाच होता भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जायचं, तिथून सकाळी ८ च्या सुमारास समुद्राची ओहोटी साधून अलिबागचा किल्ला पाहायचा, नंतर कनकेश्वर मंदिर आणि करमरकर स्टॅच्यू म्युझियम बघायचं, आणि शेवटच्या फेरीबोटीने पुन्हा मुंबई गाठायची. सकाळी पाच चाळीसला आम्ही भाऊच्या धक्क्याजवळ पोहोचलो. परिसरात मासे विक्रेत्यांची लगबग सुरू झाली होती. त्यातून वाट काढत आम्ही रेवसला जाणाऱ्या जेट्टीवरील तिकीट काउंटरपर्यंत पोहोचलो. तिथे चौकशी केली असता कळले की रेवसला जाणारी पहिली फेरी सकाळी ६.३० वाजता असते. आजूबाजूच्या सहप्रवाशांकडे अधिक चौकशी केली असता असेही समजले की वेळ ६.३० असली, तरी प्रत्यक्षात बोट निघायला पावणे सात वाजतात.      हवामानानुसार बोटींचे वेळापत्रक आणि परतीची शेवटची फेरी बदलत असते. बोटीचे तिकीट १०० रुपये असून ते आधी काउंटरवर घ्यावे ला...

कोस्टल राईड - मुरुड जंजिरा आणि चौल - भाग २

Image
दुसरा दिवस      काल आमचा मुंबई ते दिवेआगार असा जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास झाला होता. आज मात्र त्याच्या तुलनेत अगदीच कमी – केवळ १२५ किलोमीटरचा, घरापर्यंतचा प्रवास बाकी होता. दिघीपर्यंतचा हा टप्पा अत्यंत सुखद गेला. कुठे खड्डे नव्हते, ना कुठलाही अडथळा. अगदी आनंददायी प्रवास झाला. मुंबईच्या रस्त्यांपेक्षा कितीतरी पटीने येथील रस्ते चांगले वाटले. रमतगमत आम्ही गाडी चालवत दिघी गावात पोहोचलो. गावात प्रवेश करताच शांतता जाणवली , पण ही शांतता काही वर्षांत हरवेल असं वाटतं. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर प्रकल्पांतर्गत दिघी बंदर आता ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरचा हिस्सा बनलंय. अडाणी इंटरनॅशनल पोर्टमुळे दिघी आता जगाच्या नकाशावर झळकतंय. मोठमोठ्या कंटेनरच्या वाहतुकीमुळे या शांत गावाचा कायापालट होणार, आणि कदाचित शांतताही हरवेल. दिघी जेट्टी आणि फेरीचा प्रवास - सकाळी पावणे आठच्या सुमारास आम्ही दिघी जेट्टीवर पोहोचलो. समोर आगारदांडा जेट्टी दिसत होती, आणि पश्चिमेला अडाणी पोर्टच्या हालचाली जाणवत होत्या. आगारदांड्याच्या पश्चिमेला भर समुद्रात अजिंक्य जंजिरा किल्ला आपलं वैभव मिरवत होता. दिघी ते आगरदां...